| मुंबई | प्रतिनिधी |
कोळीगीत सातासमुद्रापार लोकप्रिय करणारे सुप्रसिद्ध लोकशाहीर काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे गुरुवारी निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अंधेरी पश्चिम येथील ब्रह्मकुमारी आणि त्यानंतर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पारंपारिक कोळी गाण्यांचा बादशाह अशी त्यांची खास ओळख होती. कोळीगीत सातासमुद्रापार लोकप्रिय करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. डोल डोलतंय वार्यावर माझी, डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला, वेसावची पारू, हिच काय गो गोरी गोरी पोरी यासारखी अनेक कोळीगीतांचे ते गीतकार होते. मी हाय कोळी, सन आयलाय गो यासारखी अनेक कोळी गाण्यांचे ते गीतकार होते. त्यांनी निर्माण केलेल्या कोळी संगीताच्या ठेक्यावर सगळ्यांना नाचायला लावले.