• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

मुर्मू विरुध्द सिन्हा

Varsha Mehata by Varsha Mehata
July 8, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राष्ट्रपतीपदासाठी भारतीय जनता पक्षाने द्रौपदी मुर्मू यांचे नाव सुचवल्यानंतर विरोधकांची काहीशी पंचाईत झाली आहे. मुर्मू या संथाल आदिवासी समाजाच्या आहेत. ओरिसातील मयूरभंज या मागास प्रांतातून त्या येतात. त्यांच्या मूळ गावी अजूनही वीज पोचलेली नसल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिध्द झाल्या होत्या. त्यांचे काही कुटुंबीय अजूनही त्या गावात राहतात. यापूर्वी डॉ. अब्दुल कलाम यांची पार्श्‍वभूमी हीदेखील ग्रामीण गरिबीची होती. अर्थात कलाम हे राजकारणी नव्हते. त्यांनी आयुष्यात नंतर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी शिखरे सर केली तीही विलक्षण होती. मुर्मू या मात्र भाजपच्या नेत्या व कार्यकर्त्या आहेत. त्या शिक्षिका होत्या व 1997 च्या सुमाराला त्यांनी भाजपच्या राजकारणात प्रवेश केला. रायरंगपूर इथे नगरसेवकपदापासून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. 2000 सालापासून त्या दोनदा आमदार व राज्य मंत्रिमंडळात मंत्री झाल्या. यापूर्वीही त्यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत होते. यंदा त्यांचे नाव पुढे करून भाजपने एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मुर्मू या प्रतिभा पाटील यांच्यानंतरच्या दुसर्‍या महिला, मात्र आदिवासी समाजातून येणार्‍या पहिल्या राष्ट्रपती ठरतील. त्या मूळच्या ओरिसातील असल्या तरी झारखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि इतरही दूरवरच्या राज्यातील आदिवासी समाजाला भाजपकडे वळवण्यासाठी त्यांची उमेदवारी उपयोगी ठरू शकते. यातील बहुतांश राज्ये येत्या वर्षभरात निवडणुकांना सामोरी जाणार आहेत. तेथील सर्वच पक्षांना मुर्मू यांना पाठिंबा देणे भाग पडणार आहे. अन्यथा ते पक्ष आदिवासींच्या विरोधात असल्याचा प्रचार करण्याची संधी भाजपला मिळणार आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांचा संयुक्त व तगडा उमेदवार देण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी त्यांनी दिल्लीत बैठकही घेतली. शरद पवार यांचे नाव पुढे करण्याचा प्रयत्न झाला. पण पवार यांनी एकूण रागरंग ओळखून स्वतःच माघार घेतली. त्याच दरम्यान शिवसेनेतील बंडाळीची कुणकूण लागली आणि वातावरण बदलून गेले. मुर्मू यांचे नाव भाजपने विरोधकांना विश्‍वासात घेऊन जाहीर केले असते तर सहमती होऊ शकली असती असे मत आता खुद्द बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भाजपने बॅनर्जींच्या राज्यात आणि राजकारणातही चलबिचल निर्माण करण्यात यश मिळवले असे म्हणावे लागेल. यशवंत सिन्हा यांच्या रुपाने विरोधकांनी या पदासाठी एक खरा चांगला उमेदवार देण्यात यश मिळवले असले तरी दुर्दैवाने त्यांना पुरेसे पाठबळ उपलब्ध होऊ शकणार नाही. आजच्या घडीला कम्युनिस्ट, द्रमुक, काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस असे काही मोजकेच पक्ष सिन्हा यांच्या बाजूला उभे आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पडल्यानंतर सेनेचे खासदारही मुर्मू यांना मत देण्याची मागणी करू लागले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीसाठी व्हिप लागू केला जात नाही. सर्व पक्षांच्या मतदारांना सद्सद्विवेकबुद्धीप्रमाणे मतदान करण्याची मुभा असते. त्यामुळे शिवसेनेचे काही खासदार मुर्मू यांना मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच रीतीने इतर राज्यांमध्येही मागणी होऊ लागल्यास आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. मायावती, बीजेडी, वायएसआर काँग्रेस इत्यादींनी यापूर्वीच स्वतःहून तशी घोषणा केलेली आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये विरोधक भाजप सरकारपुढे चांगले आव्हान निर्माण करू शकतील असे वातावरण होते. विरोधकांना इडी वा सीबीआयचा बडगा दाखवून नामोहरम करणे, काशी, मथुरा, काश्मीर इत्यादींच्या निमित्ताने सतत हिंदुत्वाचा अजेंडा रेटणे, तथाकथित धर्मसंसदांच्या नावाखाली मुस्लिमांविरुद्ध द्वेष निर्माण करणे, महागाई आणि बेरोजगारीसारखे विषय दाबून टाकणे ही भाजप परिवाराच्या सध्याच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये आहेत. त्यांना शह देण्यासाठी विरोधक एकवटू शकतात असे मध्यंतरी वाटत होते. पण उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांमधील भाजपचे यश आणि महाराष्ट्रासारखे महत्वाचे राज्य हातातून जाणे यामुळे त्यांचे नीतीधैर्य खचल्यासारखे झाले आहे. तरीही भाजपच्या राजकारणातील हुकुमशाही व दहशत उघडी करून दाखवण्याची ही संधी त्यांनी गमावता कामा नये. ही निवडणूक विरोधक यासाठीच लढत आहेत हे सर्व पक्षांनी अधोरेखित करायला हवे. लोकांमध्ये तसा संदेश जायला हवा.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

‘पांडुरंगा लागली रे आस’चे प्रकाशन

Next Post

निधीवरून असं लागलं अस्तित्व पणाला…

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post

निधीवरून असं लागलं अस्तित्व पणाला...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?