• Login
Wednesday, August 17, 2022
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-Paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-Paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

आगोठ शेतकर्‍यांंचा कसोटीचा काळ

Varsha Mehata by Varsha Mehata
June 15, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बळवंत वालेकर

लग्न समारंभाचा उच्चांक गाठणारा, हळदीमुळे  गाजलेला, गर्दीमुळे स्मरणात राहणारा मे  महिना संपला व  पाऊस देणारा जून महिना सुरू झाला. 7 जूनला मृग नक्षत्राचा प्रारंभ होतो. शेतकरी पावसाची अपेक्षा करीत पेरणी करतो व नांगरणीसाठी सज्ज होतो. पावसाची रिपरिप, सोसाट्याचा वारा, ढगांचा कडकडाट व विजांचा चमचमाट सहन करण्याची क्षमता तयार होते.  पेरणी, लावणी व नांगरणीची आणि लावणीची कामे सुरळीत होण्यासाठी तो आगोठीची कामे उरकण्यात तो दंग होतो. सर्वत्र यंत्र युगाचा उदय झाल्यामुळे माणूस आळसावला आहे. शेतकर्‍याची कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी कमी होत आहे. पारतंत्र्य काळात विकासाचा सूर्य खेडोपाडी उगवलेला नव्हता.  गावाकडे जाण्यासाठी पाऊलवाट  हीच वहिवाट होती. शेतकर्‍यांच्या साथीला फक्त बैलगाडी होती. पाऊस पडला की गावाकडे तसेच भातशेतीकडे जाणारे सर्व रस्ते बंद होत. पर्यायाने बैलगाडी बंद होत असे. म्हणून बैलगाडीच्या सहाय्याने होणारी कामे पावसाची सर पडण्यापूर्वी उरकली जात. सर्वत्र अठराविश्‍व दारिद्य्र असल्यामुळे कच्ची घरे होती. मातीची घरे पेंढ्याने अगर गवताने शाकारली जात. पेंढारू घरे ऊन, वारा व पावसामुळे काळीकुट्ट होत. म्हणून ती दरवर्षी शाकारावी लागत. केंबळी (ऊन व पाऊस खाल्ल्यामुळे काळाकुट्ट झालेला पेंढा) राबासाठी उपयुक्त ठरतो. पूर्वी राब शेणाने तयार करून ते केंबळी अगर पाला- पाचोळ्याने भाजत असत. अशा राबात केलेल्या पेरणीत 21 दिवसांच्या कालावधीनंतर रोपे लावणीयोग्य होतात. तर अति मेहनतीने तयार केलेली रोपे 18 दिवसांत लावणीयोग्य होतात. अलिकडे  राब शेणाऐवजी (शार्ट कट) कृत्रिम खताच्या सहाय्याने तयार करतात. पूर्वी मृग नक्षत्राचा पाऊस अखंडित पडत असे.  म्हणून काही शेतकरी 20-20 खंडीच्या शेतीची लावणी वट पौर्णिमेला पूर्ण करीत असत.  
(हे काहींना अतिशयोक्ती पूर्ण  वाटेल). या हंगामात गावात दिवसा माणसे दिसत नसत. बाजारपेठा ओस पडत. एस्.टी. मध्ये प्रवाशी कमी होत.  शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गैरहजेरी वाढलेली आढळे.
पूर्वी दळणवळणाची साधने   नव्हती. बैलगाडी हेच शेतकर्‍याचे वाहन होते. सर्वत्र कच्चे रस्ते होते. पावसाची पहिली सर येताच हे रस्ते बंद होत. म्हणून घराला लागणार्‍या वस्तु – किराणा माल, कापड-चोपड, घोंगड्या, गुरांचे खाद्य इ. पाऊस पडण्यापूर्वी बैलगाडीने बाजारातून आणित. पूर्वी मिक्सर, ग्राइंडर, रोटीमेकर, कटर, वॉशिंग मशीन अजिबात नव्हत्या. घरटीने भात भरडले जाई. पाखडून तूस व भात वेगळे केले जात असे. जात्याने तांदूळ दळून भाकरी साठी पीठ काढले जाई. घरा घरात उखळ-मुसळ, जाते – घरटे कुर्‍हाड, विळा, कोयता, खरळ यांना मानाचे स्थान होते. घरटी तसेच जाते-वरवंट्यास वापरल्यामुळे (घर्षण झाल्यामुळे) टाकी देत असत. आता यंत्र युग सुरु झाल्यामुळे टाकी देऊन उदर निर्वाह करणार्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. घरापासून दूर असलेल्या विहिरीतून पोहर्‍याच्या सहाय्याने पाणी काढून ते हंड्यात भरत. हे हंडे डोक्यावरून वाहून आणत असत. पाणी भरण्याचे काम महिला सूर्योदयापूर्वी करीत. त्यानंतर दिवसभराची कामे त्या उरकीत असत. अवयवांची भरपूर हालचाल व प्रदूषण विरहित वातावरण असल्यामुळे महिला   आजाराला सहसा बळी पडत नसत. गरोदर महिला दैनंदिन  कामे करता करता खाजगी  सुईणीच्या मार्गदर्शनाखाली प्रसूत होत. आजच्यासारखी हजारो रुपये उकळणारी सिझरिंगची पद्धती नव्हती.
इरले व घोंगडी झाले इतिहासजमा आगोठ हा शेतकर्‍यांचा कसोटीचा काळ असतो. शेताच्या बांधबंदिस्तीची कामे वेळीच उरकावी लागतात.  घराची शाकारणी, गुरांच्या वाड्याची डागडुजी करावी  लागते. जळणासाठी लाकूड फाटा आणून तो वाळवून त्याची साठवणूक करावी लागत असे.  कारण सुकी फाटी असतील तरच पावसाळी चूल पेटते. व हंगामात  वेळीच जेवण होते. गुरांसाठी-विशेषत; नांगरणी करणार्‍या गुरांसाठी-पेंढा खरेदी करावा लागतो. त्याची गोठ्यात साठवणूक केली जाते. घराची व वाड्याची दुरुस्ती होते. वेळ प्रसंगी छप्पर बदलावे लागते. भात बियाण्याची विशेष काळजी  घेतो. बैललगाडी सतत वापरात असल्यामुळे बैल मांडवात (घराजवळ) बांधलेले असतात. पूर्वी रेडे राना-वनात सोडलेले असत. पेरणीपूर्वी त्यांना शोधून आणत. नांगरणी करणे हे अति कष्टाचे व त्रासाचे काम असते. म्हणून नांगर्‍यास अति महत्त्व असते. तो आधीच बुक करावा लागतो. शिवाय त्यास अ‍ॅडव्हान्स द्यावा लागतो. पूर्वी ट्रॅक्टर व पावर टिलर नव्हते. म्हणून नांगर वादातीत होता. नांगर तयार करण्यासाठी इसाड, लुमणी, जोकड, शिवला, पालवा, या वस्तू विशिष्ट आकाराच्या असाव्या. त्या राना वनात जाऊन शोधाव्या लागत. त्यानंतर सुतार त्या लाकडाची साफसफाई करून नांगर तयार करतो. नांगराचा फाळ साधारणतः  जमिनीत 6 ते 8 इंच खोल जावा लागतो. शिवाय बैलाच्या उंचीनुसार नांगर तयार करावा लागतो. बैलाचा व रेड्याचा नांगर यांच्या  जोडणीतही फरक असतो.  नांगरणी करताना दगड धोंडे व झाडाची मुळे आड आल्यामुळे  नांगर मोडतो, नांगरणीत अडथळा येऊ नये म्हणून नांगर त्वरित दुरुस्त करावा लागतो. पूर्वी रस्ते नव्हते. चिखल व दगड- धोंड्यातून वाट तयार करावी  लागे. नांगर खांद्यावर टाकून बैल सोबत घेऊन नांगर्‍या अनवाणी  शेतापर्यंत जात. पडत्या पावसात,  थंडी वार्‍यात नांगरणी करावी  लागते, वेळप्रसंगी पडत्या पावसात बांधावर जेवण उरकावे लागते. नांगर्‍यास घोंगडीचा आधार असतो, प्लॅस्टिक कापड, खोल, रेनकोट पूर्वी नव्हते,  नांगर्‍यासाठी घोंगडी खरेदी  केल्यानंतर तिचा खडबडीतपणा जाण्यासाठी ती मळावी लागते. शिवाय रोठ घालावी लागते.  तरच ती वापरण्यायोग्य होते व  दीर्घ काळ टिकते. घोंगडीमुळे नांगर्‍याचे दोनही हात मोकळे  असतात. एका हाताने नांगर व दुसर्‍या हाताने पालवा धरु शकतो. घोंगडीमुळे मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, ऊन, थंडी यांपासून संरक्षण होते. घोंगडीला ऊब असते. डोक्यावर ती व्यवस्थित बसण्यासाठी विशिष्ट तर्‍हेने बुचडी बांधावी लागते. तिच्या निर्‍या दोन इंच रुंदीच्या असतात. बुचडी घट्ट बांधण्यासाठी वळीव सुतळ वापरतात. दिवसभर चिखलात व पावसात असणारी घोंगडी कडकडीत वाळण्यासाठी रात्री   चुलीवर (पूर्वी गॅस सिलेंडर नव्हते) टांगलेल्या विशिष्ट  आकाराच्या लाकडी बेचकीवर टाकीत असत. चूल पेटताच ती कडकडीत वाळत असे. नांगर्‍याचे काम अति कष्टाचे असते. म्हणून त्यास सकाळी न्याहरी, दुपारी जेवण व रात्री पोस्त व जेवण द्यावे लागते. फाळधुणीच्या दिवशी तो पाहुणाच असतो, आता घोंगडी लुप्त झाली आहे.
इरले – पावसाळा, लावणी व इरले हे समीकरण ठरलेले होते, लावणी करताना, गुरे राखताना, घराबाहेर पडताना इरले हवेच. इरले डोक्यावर घेतल्यामुळे दोनही हात काम करण्यास मोकळे, असतात. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा तसेच ऊन यापासून संक्षण होते. येथे छत्री निरोपयोगी ठरते. ती वार्‍यामुळे उडून जाते. बांबूच्या चिरीव कांबींपासून विशिष्ट आकाराचे इरले बनवितात. त्यासाठी साधारणतः ओला बांबू वापरतात. इरल्याच्या आच्छादनासठी पळसाच्या पानांचा वापर करतात. पानांना अपेक्षित आकार येण्यासाठी ती खडखडीत वाळवून पाण्यात  बुडवून मऊ करतात. इरल्यावर रचलेली पाने सरकू नयेत म्हणून ती ओल्या काथ्याने अगर झाडाच्या सालीने घट्ट बांधतात. इरल्याच्या प्रत्येक आर्‍यामध्ये 4 इंचांचे अंतर असावे. पावसाळ्यात इरले सर्व ठिकाणी वापरत. आता ही जागा छत्री, रेनकोट, खोल इ. नी घेतली आहे. इरले झटकन वाळत असल्यामुळे घोंगडीप्रमाणे वाळविण्याची गरज पडत नाही. इरले दृष्टीस पडताच पावसाळी वातावरण निर्मिती होत असे. अस्तास गेलेले इरले व घोंगडी चे तंत्र नवीन पिढीने आत्मसात करावे, हे आवाहन !

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

पाच दिवस भीतीच्या छायेखाली तळघरात; नेत्रन धुरीची माहिती
संपादकीय

भारताचा वॉरेन बफे!

August 16, 2022
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

भाजपचा वरचष्मा

August 16, 2022
पाच दिवस भीतीच्या छायेखाली तळघरात; नेत्रन धुरीची माहिती
संपादकीय

कोण असतात ही माणसे….?

August 14, 2022
पाच दिवस भीतीच्या छायेखाली तळघरात; नेत्रन धुरीची माहिती
संपादकीय

एका शहीदपत्नीला अभिवादन

August 14, 2022
पाच दिवस भीतीच्या छायेखाली तळघरात; नेत्रन धुरीची माहिती
संपादकीय

 देशप्रेमाने भारलेले सच्चे सूर

August 14, 2022
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

आजि अमृताचा दिनु

August 14, 2022

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Archives

  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • July 220

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-Paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?