राजू कोरडे, कार्यालयीन चिटणीस, शेकाप
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे आज निधन झाले. गेली 55 वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेत, शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, श्रमिक, बहूजन व वंचित समाजाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. या समाजाच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, अनेक कायदे करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. काही काळ त्यांनी मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेे. मंत्रीपदाचा कोणताही बडेजाव न करता त्याचा फायदा कष्टकर्यांना, शेतकर्यांना कसा मिळेल या पद्धतीचे काम त्यांनी केले. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बहूजन, वंचित कष्टकरी समाजामध्ये आपल्या घरातील व्यक्ती गेल्याचे दुःख व्यक्त केले जात आहे. यापुढे गणपतरावांनी जो विचार जपला, जोपासला, जे स्वप्न पाहिलं ते सत्यात साकार करण्यासाठी कायम सतर्क व कार्यरत राहिले पाहिजे. भाई गणपतराव देशमुख यांना अखेरचा लाल सलाम.