। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हयातील महाड तालुक्यात दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळून ही कुटुंबे मातीच्या ढिगार्याखाली गाडली गेली. यामध्ये 42 कुटूंबांचा संसार उध्वस्त झाला. यातील 40 जणांचे मृतदेह स्थानिक नागरीक आणि पोलीसांनी बाहेर काढले. दोन महिलांना वाचवण्यात यश आले असले तरी त्या गंभीर जखमी आहेत. अजूनही 44 जण या ढिगार्याखाली असल्याची माहिती हाती लागली आहे. तसेच 8 कुटूंबे बाहेरगावी होती. दरडीच्या रूपाने तळीये गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महाड आणि पोलादपूर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. या पावसाने तळीये गावच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराची माती भुसभुशीत झाली .आणि गुरूवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा मातीचा ढिगारा खाली कोसळला यात गावातील 32 घरे गाडली गेली.