11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद; महाविकास आघाडीचा निर्णय

। मुंबई । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. यानुसार 11 ऑक्टोबरला राज्यव्यापी बंद पाळला जाणार आहे.

जयंत पाटील म्हणाले, आम्ही लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराविरोधात 11 ऑक्टोबरला राज्यव्यापी बंदचं आवाहन केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूरला शेतकर्‍यांना चिरडून मारण्याची जी घटना घडली त्याचा महाराष्ट्रात निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र 11 ऑक्टोबरला बंद करत आहोत. मंत्रिमंडळाने देखील याबाबत खेद व्यक्त केला आहे. मंत्रिमंडळाने मृत झालेल्या शेतकर्‍यांना आदरांजली वाहिली आहे.

Exit mobile version