महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना कर्नाटकात मज्जाव

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या राज्यात प्रवेश करू नये, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ठणकावून सांगितल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठीबहुल 865 गावांसाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जनआरोग्य विमा योजना राबविण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी हा इशारा दिला आहे. त्यामुळं कर्नाटक महाराष्ट्र हा सीमावाद पुन्हा पेटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगला तालुक्यातील एका सैनिकी शाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात याबाबत भाष्य केलं.

Exit mobile version