। जालना । प्रतिनिधी ।
मराठा आरक्षणासाठी लढा देणार्या मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी दि. 30 एप्रिल रोजी आपल्या पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली. मिशन मुंबई म्हणत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांच्या मराठवाड्यात सातत्याने बैठका होत आहेत. त्याच बैठकांसाठी दौरा करत असताना मनोज जरांगे यांची तब्येत पुन्हा अचानक बिघडली. जालन्यातून बीड दौर्यावर जात असताना भोवळ आल्याने मनोज जरांगे दौरा सोडून माघारी परतले आहेत. त्यानंतर, छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील हे गुरुवारी (दि. 01) बीड दौर्यावर असताना त्यांना भोवळ आली. जरांगे पाटील यांना उप्षाघात म्हणजे सनस्ट्रोक अतिसाराचा त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच, पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला देखील डॉ. विनोद चावरे यांनी दिला आहे.
पुढच्या आमरण उपोषणाची तारीख जाहीर
मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसले आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना पुढच्या आमरण उपोषणाची तारीख जाहीर केली असून 29 ऑगस्टला मुंबई धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले आहे.