| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या दशक्रीया विधी रविवारी (दि.07) श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर येथे होणार असल्याची माहिती पाटील कुंटूंबियांनी दिली आहे.
मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवार (दि.29) मार्च रोजी सकाळी निधन झाले. अंत्ययात्रेच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी, ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर गेल्या नऊ दिवसांपासून पेझारी येथे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी पाटील कुटूंबियांचे सांत्वन केले. मीनाक्षी पाटील यांची दशक्रीया विधी रविवारी (दि.07) श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर येथे होणार असून बुधवार (दि.10) एप्रिल रोजी पेझारी येथे उत्तरकार्य होणार असल्याची माहिती पाटील कुटूंबियांनी दिली आहे.