खानावले ग्रा.पं.कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

| रसायनी | वार्ताहर |
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीनजीकच्या खानावले ग्रामपंचायतीकडून दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. परिसरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा राबविण्यात आल्याचे उपसरपंच मोहन लबडे यांनी सांगितले.

याचप्रमाणे सन 2022-2023 च्या दहावी व बारावीच्या परीक्षेत जास्त टक्केवारीत उत्तीर्ण असणार्‍या विद्यार्थ्याला एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडा फडकविण्याचा मान देण्यात येईल, तसेच प्रथम क्रमांक रोख 11111, व्दितीय 5555 व तृतीय क्रमांक 3333 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे उपसरपंच मोहन लबडे यांनी सांगितले. यावेळी सरपंच जयश्री सुभाष नाईक, उपसरपंच मोहन लबडे, ग्रामविकास अधिकारी रमेश तारेकर, काशिनाथ ठाकूर, संतोष लबडे, संजय लबडे, आकाश पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version