मोदी सरकारचे निर्णय चुकले-अमित शाह

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतील, मात्र त्यामागे असणारी सरकारची भावना मात्र स्वच्छ होती असं म्हटलं आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या 94 व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. देशातील 130 कोटी लोकांचा लोकशाहीवरील विश्‍वास अजून वाढला आहे हेच मोदी सरकारचं सर्वा मोठं यश असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं. देशाच्या विकासात फिक्कीचं योगदान कौतुकास्पद असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. अमित शाह म्हणाले की, निर्णय चुकीचा आहे असं होऊ शकतं. पण भावना मात्र चुकीची नव्हती. पुढे बोलताना त्यांनी आमच्यावरील टीकाकारही गेल्या सात वर्षात देशात खूप मोठे बदल पहायला मिळाल्याचं मान्य केले आहे. सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप लागलेला नाही. सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतरच सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत, असं यावेळी त्यांनी सांगितले. कोरोना संकटादरम्यान सरकारने असे अनेक निर्णय घेतले ज्याचा फायदा पुढील बर्‍याच काळापर्यंत होईल असं अमित शाह म्हणाले. अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून देशाचा आर्थिक दर दुहेरी अंकी झाल्यास आश्‍चर्य वाटण्याचं कारण नाही असा विश्‍वास अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला.

Exit mobile version