घरगुती वादातून सासू आणि सुनेची रेल्वेखाली आत्महत्या; खालापूरातील नवघर गावातील घटना

। पनवेल । प्रतिनिधी ।

खोपोली, नवघर येथील घरगुती वादातून नलिनी हरिचंद्रं देशमुख (वय ५५) व प्रतिक्षा देशमुख (वय २६) या सासू-सुनेने खोपोली मध्य रेल्वेच्या लौजी – डोळवली रेल्वे स्थानक दरम्यान नवघर गावाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२०) रात्री नऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version