संपाची कोंडी फुटेना

विलिनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम
भाजप नेत्यांची संपातून माघार
आझाद मैदानावरील आंदोलन समाप्त
मुंबई | प्रतिनिधी |
राज्य सरकारतर्फे पगारवाढ जाहीर करुनही कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम राहिल्याने गेले 18 दिवस सुरु असलेला एसटीचा संप गुरुवारीही मिटू शकला नाही.या संपाचे नेतृत्व करणारे भाजपचे आ.सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी संपातून माघार घेतल्याने कर्मचार्‍यांना आता नेताच उरला नसल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. दरम्यान,बुधवारी परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांनी कर्मचार्‍यांना 41 टक्के पगारवाढीची घोषणा करताना कर्मचार्‍यांनी गुरुवारी कामावर हजर व्हावे,असे आवाहन केले होते. पण गुरुवारी सकाळी कर्मचारी संघटनांनी संपावर राहण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.त्यामुळे संपाची कोंडी काही फुटू शकली नाही.
सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांनी माघार घेतली असली तरी हे आंदोलन सुरुच राहणार आहे, अशी घोषणा कामगारांनी केली आहे. हा लढा न्यायालयात लढणारे गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानातील आंदोलन मागे घेतलं गेलं असलं तरीही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे त्यांनी हा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

हे आंदोलन कामगारांनी उभं केलं आहे,त्यामुळे त्याबाबतचा निर्णय आता त्यांनीच घ्यावा. आझाद मैदानावरचं आंदोलन तात्पुरतं मागे घेत आहोत. आंदोलन चालू ठेवलं तर त्यांना पाठिंबा राहिलच, मात्र तो निर्णय त्यांनीच घ्यावा.
आ. सदाभाऊ खोत

एसटी कर्मचार्‍यांची आम्ही शुक्रवारी सकाळपर्यंत वाट पाहू. जे संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.तुटेपर्यंत ताणू नये. त्यानंतर जोडता येणार नाही.
अनिल परब,परिवहन मंत्री

समितीसमोर म्हणणे मांडा
परिवहन मंत्री परब म्हणाले की, अजूनही एसटी कर्मचार्‍यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी त्या समितीसमोर मांडव्यात. आम्ही उच्च न्यायालय विलीनीकरणार जो निर्णय देईल, ते मान्य करणार आहोत. त्यामुळे यापुढे संप करून जनतेला वेठीला धरू नका,असे आवाहन त्यांनी केली.

Exit mobile version