नारायण राणेंच्या वकिलाने दिले अस्वस्थेचे कारण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी महाड न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यांचा सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार राणेंना 30 ऑगस्टला अलिबाग पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला. मात्र सोमवारी त्याच्या वकिलांनी हजेरी लावत नारायण राणे यांच्या अस्वस्थेचे कारण दिले. त्यामुळे नारायण राणे हजर राहण्याची चिन्हे धूसर झाली आहेत.

Exit mobile version