मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आठवडाभरात अनेक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामागे राज्यशासनाचा निष्काळजीपणा आहे. कायदा व्यवस्था सरकारच्या नियंत्रणात नसल्यामुळेच या घटना घडल्या आहेत, असे महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हटले आहे.
साकीनाका महिला बलात्कार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गांभीर्याने दखल घेतली असून,आयोगाच्या पथकाने दुर्घटनास्थळास भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली. महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.
पीडितेच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली आहे.पोलिसांकडून संबधित घटनेची माहिती घेतली आहे. तिच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांना भेटून विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर यावर चर्चा करता येऊ शकेल असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी सांगितले. ही दुर्देवी घटना आहे. मुंबईत गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु असताना भररस्त्यात अशी घटना घडते याचा अर्थ इथे आरोपी निरंकुश आहेत. आरोपींना कोणाची भीती नाही आहे. आरोपींच्या मनात भीती असती तर त्या रात्री अशी घटना घडली नसती. गेल्या काही दिवसांपासून अनेक घटनांची माहिती घेतली आहे.