हॉटेल, दुकानांसाठी सरकारचे नवे नियम

। मुंबई । प्रतिनिधी ।
कोरोनाच्या निर्बंधांमुळे विविध दुकानं, हॉटेल्स ठराविक वेळेतच खुली ठेवण्याबाबतचे आदेश आता रद्द करण्यात आले असून पूर्वीप्रमाणेच या सर्व गोष्टी सुरु राहणार आहेत. राज्य शासनाने याबाबतचे नवे आदेश जाहीर केले आहेत. यामुळे दुकानदार आणि हॉटेल चालकांसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

नव्या आदेशांनुसार, रेस्तराँ आणि खाद्यपदार्थांची दुकानं आता मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुली राहतील तर दुकानं आणि अस्थापनं रात्री 11 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. तात्काळ प्रभावानं ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेता संबंधित ठिकाणी काही बंधनं लागू होतील. पण यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घेणं गरजेचं असणार आहे, असं शासानानं काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Exit mobile version