अरे बापरे…महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू! वडेट्टीवार म्हणाले…

केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ या राज्यांना नाइट कर्फ्यू लावण्याचा विचार करण्यास सांगितले आहे. त्याबाबत विचारले असता राज्यात नाइट कर्फ्यू लावला जाणार नाही, आणि याबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झालेली नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच तिसर्‍या लाटेबाबत सतर्कतेचा इशारा देत सर्वच राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे. हे उघडा ते उघडा या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करतो आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जीवाचे रक्षण करायला हवे.

सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल. मला वारंवार आपणांस हे आवाहन एवढ्याचसाठी करावे लागते आहे, कारण कोरोना परत वाढतोय. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.

Exit mobile version