। मुंबई । प्रतिनिधी ।
येत्या 6 डिसेंबर, अर्थात महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. मात्र, यंदाही मुंबईवर करोनाचे सावट असल्याने चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने जमा होण्यास आणि जाहीर कार्यक्रम घेण्यास राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना आपापल्या घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन राज्य शासनानेही केले आहे. तसेच चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकात आदरांजली वाहण्यासाठी येणारे नेतेमंडळी आणि मान्यवरांनीही लशीचे दोन डोस घेतलेले असावे, असे बंधनकारक करण्यात आले आहे.
यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी देखील गर्दी न करता बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेते आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केले आहे. राज्य सरकारने यंदाच्या 6 डिसेंबर, या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार, दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात कोणतेही स्टॉल्स लावता येणार नाहीत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी बाबासाहेबांना आपापल्या घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहनही राज्य शासनानेही केले आहे. तसेच चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकात आदरांजली वाहण्यासाठी येणारे नेतेमंडळी आणि मान्यवरांनीही लशीचे दोन डोस घेतलेले असावे असे बंधनकारक करण्यात आले आहे. जर जवळ लस प्रमाणपत्र नसेल तर अशा मान्यवरांना परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.