| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
खाजगी कंपनीच्या सीआरएस फंडातून विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचे तीन वेळा लोकार्पण करण्याचा प्रताप कळंबोली वसाहतीत करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्याने प्रशासनाला आव्हान दिल्या नंतर उद्यानाचे बंद असलेले दरवाजे अनऔचारिक रित्या सर्व सामान्यासाठी खुले करण्यात आले होते. मात्र त्यानंतर औपचारिकरित्या उद्यान सर्व सामान्यांसाठी खुले करण्यात आल्याने या कार्यक्रमाचे श्रेयवाद घेण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे त्याच उद्यानाचा उदघाटन सोहळा साजरा करण्यात आल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.
पनवेल पालिका क्षेत्रातील कळंबोली वसाहतीत सेक्टर 6 येथील भूखंड क्रमांक 2 वरील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील आईजीपीएल कंपनीच्या सीआरएस फडातून जवळपास अडीच कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेले हे उद्यान सर्व सामान्यांसाठी खुले झाले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नितीन काळे यांनी हे उद्यान सर्व सामान्यांना खुले करून द्यावे अशे पत्र पालिका प्रशासनाला पाठवले होते. काळे यांनी दिलेल्या पत्रात उद्यान खुले न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील पालिका प्रशासनाला देण्यात आला होता. काळे यांच्या ईशार्या नंतर लगेचच पालिका प्रशासनाने हालचाल करत उद्यानाचे दरवाजे सर्व समान्या साठी खुले करून दिले. मात्र काळे यांच्या अगोदर बाळासाहेबांची शिव सेनेचे नेते रामदास शेवाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते माजी नगरसेवक सतीश पाटील यांनी देखील उद्यान खुले करण्यासाठी पालिका प्रशासनासोबत पत्र व्यवहार केला असल्याने सर्वसामन्या साठी खुले करण्यात आलेल्या या उदयनाचा लोकार्पण सोहळा तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आप आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पार पाडला आहे.