| नेरळ | वार्ताहर |
भाताचे कोठार म्हणून समजल्या जाणाऱ्या कर्जत तालुक्यात भाताचे विक्रमी पीक घेतले जाते. त्यामुळे भातपीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येताच असंख्य शेतकऱ्यांनी भातपीक तसेच नाचणी पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत. कर्जत तालुक्यात चार मंडळात ही स्पर्धा होत असून भाताचे प्लॉट यांची कापणी, मळणी आणि मोजमापे आदी कामे कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरु असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड यांनी दिली आहे.
तालुक्यात भात हे सार्वधिक प्रमाणात घेतले जाणारे पीक असून या सध्या तालुक्यात 9000 हेक्टर जमिनीवर भाताचे पीक घेतले जाते. त्यामुळे नाचणी आणि भात पीक स्पर्धेत मोठ्या प्रमाणात शेतकरी यांनी सहभाग घेतला आहे. जुलै महिन्यात भातपीक आणि नाचणी पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल केले होते. या स्पर्धेसाठी भाताच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 20 गुंठे क्षेत्र तर नाचणी पीक स्पर्धेसाठी 40 गुंठे जमिनीवर पीक घेणे बंधनकारक असते. या स्पर्धेसाठी सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांना 300 रुपये तर आदिवासी शेतकरी यांच्यासाठी 150 रुपये फी शासन घेत असते. तर कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत सध्या शेतकऱ्यांच्या भात तसेच नाचणी पीक स्पर्धेत भाग घेतलेल्या शेतातील प्लॉट मध्ये बहरलेले पीक यांची कापणी शेतकरी कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत करीत आहेत.
20 गुंठे क्षेतार्तील कोणताही एक गुंठे क्षेत्रातील भातपिकाची कापणी झाल्यानंतर काहीवेळाने मळणी करण्यात येते. आणि त्याच ठिकाणी भाताचे वजन तसेच पेंढ्याचे देखील वजन कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी करून घेत असतात. यावर्षी भातपीक आणि नाचणी पीक स्पर्धेत कर्जत तालुक्यात 52 शेतकऱ्यांनी भाग घेतला आहे. तालुक्यातील कृषी विभागाचे चार कृषी पर्यवेक्षक असौन त्यांच्या हद्दीत तालुक्यातील सर्व गावे आणि आदिवासी वाड्या यांचा समावेश आहे. तालुक्यात कर्जत, कलामब, कशेळे आणि नेरळ असे विभाग असून तेथे शेतकरी यांनी पीक स्पर्धेत भाग घेतला आहे.