पनवेल मविआतर्फे केंद्राचा निषेध

धरणे आंदोलनास प्रतिसाद
| पनवेल | वार्ताहर |
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी ( 28 मार्च) पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले होते त्याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येूवन छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलनाला सुरूवात केली.

यावेळी केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबविण्यात आली होती. याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्वाक्षरी मोहिमेमार्फत केंद्र सरकार, भाजप यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस, माजी आम. बाळाराम पाटील, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, बबन पाटील, शिरीष घरत, सुदाम पाटील, नंदराज मुंगाजी, आर.सी.घरत, हेमराज म्हात्रे, काशिनाथ पाटील, हेलमता म्हात्रे, श्रृती म्हात्रे, अर्चना कुळकर्णी, विद्या चव्हाण, एकनाथ म्हात्रे, डी.एन.मिश्रा, विश्‍वास पेटकर, प्रवीण जाधव, यतीन देशमुख, नारायणशेठ घरत, कृष्णकांत कदम, शशिकांत बांदोडकर, वैभव पाटील, मा.नगरसेवक रवींद्र भगत, मिलींद पाडगावकर आदींसह महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी बबन पाटील , शिरीष घरत,सुदाम पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

मोदी सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच तसेच राहूल गांधी यांनी देशभरात काढलेल्या रॅलीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकरली असून देशातील वातावरण बदलत चालल्याने मोदी सरकारने हे निंदनीय कृत्य केले आहे. याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे.

– महेंद्र घरत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष
Exit mobile version