सरसकट नव्हे तर पिकांप्रमाणे नुकसानभरपाई द्या; आ.जयंत पाटील

| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकाला सरसकट नव्हे तर पिकाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली.

बुधवारी या मुद्यावर बोलताना त्यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले की, सरकारने पिकाचे नुकसान झाले म्हणून सरकारने सरसकट नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केलेले आहे. मात्र, या सरसकट मदतीला माझा विरोध आहे. द्राक्ष असो वा भात प्रत्येकाचा खर्च वेगवेगळा असतो. त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई दिली गेली तर त्याचा फटका संबंधित शेतकर्‍यांना बसणार आहे. यासाठी पिकांप्रमाणे मदत दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

ज्या प्रमाणे सरकारने जनावरांनासाठी सरसकट मदत जाहीर केली त्यात बोकडाला पण तीच मदत आणि म्हशीलाही तीच मदत हे धोरण अयोग्य असल्याचे त्यांनी सुचित केले.

Exit mobile version