वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न

| कोलाड | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरुन मुंबई, ठाणे, तसेच पुणे येथून 25 डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी असल्यामुळे असंख्य पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणात निघाले आहेत.परंतु खांब,कोलाड, इंदापूर,माणगांव, येथील चौपदरी करणाच्या अपूर्ण कामामुळे येथे प्रवाशी वर्गाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे हा वाहतूक कोंडीचा तिढा केव्हा सुटणार?, असा सवाल प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत असुन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रायगड पोलिसांकडून शर्थिचे प्रयत्न सुरु आहेत.

गुरुवारी (दि.25) नाताळची सुट्टी तसेच आल्हादायक थंडी असल्यामुळे याचा आनंद घेण्यासाठी मुंबई, ठाणे पुणे, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात असंख्य पर्यटक मुंबई-गोवा हायवेवरुन एसटीबस, फोर व्हिलर, रिक्षा, टू व्हीलर, तसेच इतर वाहनांनी कोकणात निघाले आहेत. परंतु, मुंबई-गोवा हायवेवरील खांब, कोलाड, इंदापूर, माणगाव, येथील अपूर्ण कामामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन वाहतूक कोंडी निर्माण झाली.

मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड येथे उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. तसेच पुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडचे ही काम सुरु आहे. या खांब येथील ब्रिजचे काम सुरु असल्यामुळे येथील अपूर्ण रस्त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परंतु, कोलाड सपोनि नितीन मोहिते तसेच पोलिस कर्मचारी, वाहतूक पोलिस, जागोजागी उभे राहून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करीत आहेत.

Exit mobile version