हरिश्चंद्र वाजंत्री तंटामुक्तीचे अध्यक्ष

| चणेरा | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील कोकबन ग्रामपंचायतीत हरिश्चंद्र वाजंत्री यांची सलग 11 वेळा तंटामुक्त अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या. त्या नंतर महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षाचा विषय घेण्यात आला .त्यावेळी पारंगखार येथिल पांडुरंग तांबडे यांनी सुचवल्या नुसार सभेसाठी आलेल्या 150 ते 170 लोकांनी एक मताने वाजंत्री यांची महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आले. त्यास दिव येथील सुरेश पाटील याने अनुमोदन केले.

Exit mobile version