संजय राऊत यांचा उपहासात्मत सवाल
। मुंबई । वृत्तसंस्था ।
पंतप्रधान मोदींनी सार्वजनिक जागांचे खासगीकरण केले आहेच. आता तुरूंगाचे सुद्धा खासगीकरण केले आहे का? असा उपहासात्मक सवाल करत खा. संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजपामधले काही फुटकळ लोक धमक्या देत आहेत. असे लोक ज्यांचा भाजपाशी काही संबंध नाही, जे मुळ भाजपा मधले नाहीत, ज्यांना भाजपा माहित नाही, विचारधारा माहीत नाही ते लोक धमक्या देत आहेत. रोज उठतात आणि बोलतात ह्याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू, तुरुंग विकलेत का? त्या तुरुंगाच्या चाव्या बाहेरून आलेल्या काही लोकांकडे दिल्या आहेत का? असा प्रश्न विचारला आहे.
याशिवाय, आज याचा नंबर, उद्या त्याचा नंबर म्हणता, तर तुम्ही कायद्याचे पण मालक झाले आहात का? असा प्रश्न विचारत लक्षात ठेवा उद्या तुमचा पण नंबर येईल, अशीही सूचनाही त्यांनी केली. मोदी है तो मुमकीन है! हे अशा वेळी खरे वाटते, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.