। खोपोली । प्रतिनिधी ।
कार्तिकी एकादशी निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यासाठी जात असताना खालापूर-खोपोली-कर्जत वारीत पिकअप टेम्पो घुसून अतिशय भयानक अपघात घडला. या अपघातात चार महिला व 34 वारकरी जखमी झाले असून, यातील सात जखमी वारकर्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांची स्थिती नाजूक आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते दत्ताजी मसुरकर यांनी पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, श्रीरंग बारणे, व रायगड जिल्हाधिकारी यांना विशेष निवेदन देऊन या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना व सर्व जखमी वारकर्यांचा संपूर्ण उपचारासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीने आर्थिक मदत मिळण्याची विनंती केली आहे.त्या बाबत त्यांनी विविध स्तरावर निवेदन दिले आहे.