मुंबई हायकोर्टाचा निकाल
मुंबई | प्रतिनिधी |
कुणालाही सार्वजनिक सुट्टीचा कायदेशीर अधिकार नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
देशातील तमाम नोकरदार वर्गासाठी आठवड्याच्या सुट्ट्यांशिवाय वर्षभरातील इतर काही महत्त्वाच्या दिवशी (उदा. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, दिवाळी इ.) असलेल्या सार्वजनिक सुट्ट्या म्हणजे कर्मचार्यांसाठी त्यांच्या वैयक्तिक गोष्टींचं नियोजन करण्यासाठी हक्काचा दिवसच असतो.पण बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीमध्ये न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने यासंदर्भातला निकाल दिला. दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातल्या सिल्वासामधील किशनभाई घुटिया या 51 वर्षीय व्यक्तीने एक याचिका दाखल केली होती. आदिवासी नवजीवन जंगल आंदोलन या संस्थेने देखील अशीच याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी न्यायालयानं घेतली.