कडधान्ये पिके बहरली

| खांब-रोहा । वार्ताहर ।
कडाक्याची थंडी व अधून-मधून पडणारे धुके यामुळे कडधान्ये पिकास पोषक परिस्थिती निर्माण झाल्याने कडधान्ये पिके बहरल्याने शेतकरी वर्ग समाधानी झाला आहे. चालू ऊन्हाळी हंगामात शेतकरी वर्गाने खरीप पिक अंतर्गत दिवाळी सणानंतर आपापल्या शेती क्षेत्रात विविध कडधान्ये पिकांची लागवड केली. पावसाळी हंगामातील भातशेतीचे तर मोठे नुकसान झाले होते. त्यामुले याचा फटका कडधान्ये पिकाला बसतोय की अशी भिती शेतकरी वर्गातून व्यक्त होत असतानाच कडधान्ये पिकांनी परिस्थितीवर मात करून पिके चागली बहरली असल्याने शेतकरी वर्ग समाधानी दिसत आहे.

Exit mobile version