मजगाव येथील स्मशानभूमी रस्त्याचे उद्धघाटन
| आगरदांडा | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागाचा विकास हा शेतकरी कामगार पक्षच करू शकतो.रायगड जिल्ह्यातील अनेक गावात पाण्याच्या योजना प्रभावी पणे राबवल्यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे कमी झाले आहे. लोकांनी शेकापच्या कामावर नेहमीच विश्वास दाखवला आहे. हा विश्वास आम्ही कधीही ढळू देणार नसल्याचे माजी आ.पंडित पाटील यानीं सांगितले. मुरुड तालुक्यातील मजगाव ग्रामपंचायतीच्या समशान भूमी रस्त्याचे व समशान शेडचे दुरुस्ती या दोन्ही कामाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.मजगाव येथील ग्रामस्थांनी या कामाची मागणी केली होती. त्यानुसार माजी आ. पंडित पाटील यांनी रायगड जिल्हा परिषद सेस फंडातून सुमारे सहा लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.
सदरची कामे पूर्ण होताच या कामांचे लोकार्पण मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मनोज भगत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी माजी आ. पंडित पाटील, माजी सभापती चंद्रकांत कमाने, माजी सरपंच संतोष जमनु, उपसरपंच महेश पाटील, विकास दिवेकर, माजी सरपंच अजीत कासार, जयेंद्र कासार, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मनोज भगत यांनी लोकांनी विकास कामे करणार्या पक्षाबरोबर राहून आपल्या परिसराचा विकास करून घ्यावा असे सांगितले. यावेळी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.