शासनाकडे देणार धडक
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात पूर परिस्थिती मुळे अडचणीत सापडलेल्या जनतेकडे कुठलीही दया माया न दाखवत महावितरण कंपनीने सुरू केलेल्या सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात आक्रमक झालेल्या शेतकरी कामगार पक्षाने शासनाकडे धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.
महावितरण कंपनीने मनमानी कारभार सुरू करून सामान्य जनतेची पिळवणूक सुरू केलेली आहे, भरमसाठ येणारे विजबिल, आणि त्वरित विजबिल भरले नाही तर वीज कनेक्शन कट असा कायदा काढलेला आहे. यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत, सर्वांच्या न्यायहक्कांसाठी 26 जुलै2021 रोजी सकाळी 11 वाजता शेकाप नेते माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांत ऑफिस येथे धडक देत निवेदन देण्यात येणार आल्याची माहिती तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी दिली.