। म्हसळा । वार्ताहर ।
सायगावच्या माजी सरपंचा तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक श्रीवर्धन शाखेच्या व्यवस्थापक लिलाधर रिकामे यांच्या मातोश्री राधिका गोविंद रिकामे यांचे रविवारी (दि.7)वृध्दापकालाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 95 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे आणि आप्तेष्ट परिवार आहे. राधिका रिकामे यांचे प्रेमळ मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. शेतकरी कुटुंबातील असुनही मेहनत करून त्यांनी मुलांना उच्चशिक्षित, संस्कारीत करून त्यांना सामाजिक सेवेची आवड निर्माण केली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली.