राजू मुंबईकर यांनी जाणली आदिवासींची व्यथा
। उरण । वार्ताहर ।
उरण रानसई येथील आदिवासी वाडीवरील मार्गाची वाडी ते ट्रान्सफार्मरपर्यंतचा तब्बल 150 मीटरचा संपूर्ण रस्ता स्वखर्चाने राजू मुंबईकर यांनी नवीन बांधला आहे.
या आधी याा रस्त्याची दूरवस्था झाली होती. या खराब रस्त्यामुळे कामानिमित्त बाहेर जाणारा आदिवासी बांधव, महिला वर्ग आणि शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी तरुण तरुणी यांनी आपली व्यथा राजू मुंबईकर यांच्या समोर मांडली होती. त्यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांना शब्द दिला होता तो आज पूर्ण केला.
हा दीडशे मीटरचा रस्ता बनविण्यासाठी लागणारे सर्व सामान मागविण्यात आले. परंतु या दुर्गम वाडीवर ते वाहून नेणे म्हणजे दिव्यच म्हणावे लागेल. तेव्हा येथील आदिवासी बांधवांना राजू मुंबईकर यांनी श्रमदानासाठी आवाहन करून मदत करण्यासाठी सांगितली. या आवाहनाला अगदी उदंड प्रतिसाद देत किमान अडीचशे ते तीनश आदिवासी बंधाव आपली अवजारे घेऊन कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणे हजर झाले. आणि बघता बघता आदिवासी बांधवांच्या श्रमदानातुन आणि राजू मुंबईकरांच्या औदार्यातुन सुरू झालेलं हे पवित्रकार्य सर्वांनी मिळून पूर्णत्वास नेले.
या कामासाठी जे.एम.म्हात्रे ट्रस्ट पनवेल आणि पी पी .खारपाटील ट्रस्ट चिरनेर यांचे विशेष सहकार्य लाभल्याने राजू मुंबईकर यांनी त्यांना धन्यवाद दिली. हा रस्ता तयार झाल्यावर येथील आदिवासी बांधवांनी नाचून आणि गाणी गाऊन आपला आनंद व्यक्त केला.