सिंधुदुर्गात राणेंचा प्रचार सुरू; शिवसेनेचा अजूनही मतदारसंघावर दावा

| सिंधुदुर्ग | वृत्तसंस्था |

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवारी अजून निश्‍चित झालेली नाही. या मतदारसंघावर आजही शिवसेनेचाच दावा आहे. त्यामुळं या मतदारसंघातील उमेदवारी ही निश्‍चितपणे शिवसेनेलाच मिळेल, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. मतदानाला अवघे 34 दिवस बाकी असून सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट यांच्याकडून कोणतीही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. तरी आज बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुरुवातीला कोर कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर महायुतीची समन्वय समितीची बैठक होणार होती. मात्र, मंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर असूनसुद्धा त्यांनी या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला हजेरी लावली नाही.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघातील उमेदवारी अजून निश्‍चित झालेली नाही. या मतदारसंघावर आजही शिवसेनेचाच दावा आहे. त्यामुळं या मतदारसंघातील उमेदवारी ही निश्‍चितपणे शिवसेनेलाच मिळेल असा दावा, मंत्री उदय सामंत यांनी कुडाळमध्ये माध्यमांशी बोलताना केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये आज शिवसेना आणि भाजपाची समन्वय समितीची बैठक होती. मात्र, या बैठकीला उदय सामंत हे उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी नारायण राणे यांच्याशी बंद खोलीत काही वेळ चर्चा केली आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळं या मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजून कायम आहे. दरम्यान, किरण सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून रात्री उशिरा आपण माघार घेत असल्याचं स्टेटस ठेवलं होतं. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते स्टेटस काढलं. अजूनही आमची आशा आहे की, हा मतदारसंघ निश्‍चितपणे शिवसेनेकडेच राहील अशा पद्धतीचा दावा सुद्धा उदय सामंत यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून उमेदवारी जरी जाहीर झाली नसली तरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत संघटनात्मक आढावा बैठक घेण्यात आलीय. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघावर आपला प्रबळ दावा ठोकला आहे.

Exit mobile version