। चिपळूण । वार्ताहर ।
कोयना अवजलातील 67.50 टीएमसी पाण्यापैकी पन्नास टीएमसी पाणी उत्तरेकडील खोर्यात वळवले, तर त्यामधून रत्नागिरी जिल्ह्याला 42.91 कोटी रुपये उपकरापोटी मिळतील, असे मत पाटबंधारे महामंडळाच्या अभियंता वैशाली नारकर यांनी व्यक्त्त केले आहे. आयोजित जलपरिषदेच्या निमित्ताने करण्यात येणार्या सादरीकरणादरम्यान त्या बोलत होत्या. करताना नारकर म्हणाल्या की, कोयनेचे अवजल टनेलद्वारे समुद्रात सोडा, अशी मागणी होत आहे; परंतु तसे करण्यापेक्षा अवलजाचे आर्थिक संपत्तीत रुपांतर केल्यास रत्नागिरी जिल्ह्याला फायदा होईल.
याशिवाय, सगळे पाणी कोकणासाठी वापरावे ही मागणी व्यवहार्य नाही. या पाण्यावर उपसा सिंचन योजना राबविल्यास त्या खर्चिक ठरु शकतात. अवजलातील 17.5 टीएमसी पाणी वापरासाठी छोटे प्रकल्प उभारता येतील. त्यासाठी या निधीतील चाळीस टक्के रक्कम खर्च करता येऊ शकते. त्यादृष्टीने विचार करण्याची वेळ आली असल्याची सूचना त्यांनी केली. तर वाशिष्ठीचे पाणी 36 गावातील क्षेत्राला वापरण्यात येणार होते. पण तो प्रकल्प खर्चिक असल्यामुळे मागे पडला. सध्या कोकणाचा जल आराखडा तयार झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली.