। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
एक अतिशय महत्त्वाची आणि पालकांना दिलासा देणारी बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठीची नोंदणी 1 जानेवारीपासून करायची संधी मिळणार आहे. उेुळप पोर्टलवर ही नोंदणी करता येणार आहे.
खरे तर 12 वर्षांच्या पुढील मुलांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारने तूर्तास 15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण करायला मान्यता दिली आहे. ओमिक्रॉनच्या विषाणूमुळे जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. हे पाहता अमेरिका आणि इंग्लंडसारख्या ठिकाणी मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता भारतही पाऊल टाकताना दिसतो आहे.
1 जानेवारीपासून उेुळप पोर्टलवर लहान मुलांची लसीकरण नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ओळखपत्र म्हणून विद्यार्थ्यांचे शाळेतील ओळखपत्र जोडले जाणार आहे. त्यामुळे आपल्या मुलाचे वय पंधरा असेल, तर ओळखपत्र जरूर असू द्या. शाळेतून मिळाले नसेल, अथवा हरवले असेल तर ते पुन्हा एकदा काढा. या नोंदणीनंतर 3 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. तूर्तास भारतातील मुलांना कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर ठेवले जाणार आहे.
ओमिक्रॉनची झळ किचनपर्यंत
राज्यात ओमिक्रॉनचे संकट अधिकच गडद होत आहे. त्या अनुशंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सरकारच्या माध्यमातून केल्या जात आहेतच पण मास्क हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. कोरोना बाबतच्या नियमावलीचे पालन न केल्यास कारवाईलाही सुरवात झाली आहे. मात्र, मुंबई येथील भायखळा भाजीपाला व्यापारी संघाने असा निर्णय घेतला की मास्क घातल्यशिवाय भाजी देखील खरेदी करता येणार नाही. या निर्णयामुळे ग्राहकही सुरक्षित राहणार आहेत तर विक्रेत्यांनाही कोणताही संकोच राहणार नसल्याने हा निर्णय घेतल्याचे व्यापार्यांनी सांगितले आहे. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाजीमंडईतील दुकानांसमोर मास्क नाही, भाजी नाही असे फलक दिसत आहेत.
राज्यातील मंदिरे बंदीचा इशारा
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मंदिरे पुन्हा बंदी केली जाण्याबद्दल भाष्य केले आहे. तुळजापुरमध्ये कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेल्या पवार यांनी देवीच्या दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कोरोनाच्या नवीन नियमांच्या हवाल्याने हे वक्तव्य केले.ओमायक्रॉनसह मूळ करोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मत्रालयाने महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवली आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेत झालेला निर्णयप्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी ओमायक्रॉनच्या नियंत्रणाची जबाबदारी केंद्राने राज्यांवर सोपवल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच सूचित केले आहे.
नियमाचे व केंद्राच्या निर्देशाचे पालन केल्यास अशी वेळ येणार नाही मात्र महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढल्यास मंदिरे पुन्हा बंद होऊ शकतात. राज्यांना रात्रीची संचारबंदी, लोकांच्या सार्वजनिक वावरावर नियंत्रण,अधिक रुग्णसंख्या असलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक विभाग आदी निर्बंध लागू करावे लागतील व परिस्थितीनुसार राज्यांना निर्णय घ्यावे लागतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.