महावितरण कंपनीला निवेदन सादर
| कर्जत | प्रतिनिधी |
व्होल्टेजच्या समस्यांबाबत विठ्ठलनगरवासियांनी सोमवार, दि.9 जून रोजी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. सोनिया गरवारे यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग गरवारे, प्रल्हाद बहुगुणी, राजन दगडे, विलास चंदन, अवधूत केळकर, राजन वैशंपायन ॲड, सुषमा ढाकणे, बिराज पाटकर, सर्वेश गोगटे, ॲड. अभिषेक तिवारी, प्रशांत प्रभुणे, सचिन श्रीखंडे आदी यावेळी उपस्थित होते.
व्होल्टेज कमीमुळे त्याचा परिणाम विठ्ठलनगरवासियांच्या दैनदिनी जीवनावर होत आहे, ज्यामुळे लिफ्ट, रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन, पाणी पुरवठा आदींवर त्याचा परिणाम होत आहे सध्याची ट्रान्सफॉर्मर क्षमता 100 केव्हीए आहे जी विठ्ठलनगर आणि आसपासच्या 20 हून अधिक इमारतींना वीज पुरवते, ज्यामुळे व्होल्टेजमध्ये गंभीर चढ-उतार होतात. तसेच या परिसरातील काही पोल पडले होते ते पुन्हा उभारण्यात आले नाही ते पुन्हा उभे करावेत, आम्ही 215 किलोवॅट क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी या निवेदनाव्दारे करीत आहोत, जेणेकरून अखंडित व सुरळीत वीजपुरवठा होऊ शकेल.
पडलेल्या पोलच्या जागी नवीन पोल लगेच टाकून देतो व व्होल्टेजची समस्या लवकरच दूर करण्यात येईल.
चंद्रकांत केंद्रे,
उपकार्यकारी अभियंता