। पनवेल । वार्ताहर ।
शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली खारघर शहर येथे जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी शालेय विद्यार्थ्यासह इतर समस्यांचे निराकरण करण्यात आले .यावेळी सदर जनता दरबारात अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. या समस्यांचे निराकरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. खारघर शहरप्रमुख गुरुनाथ पाटील व खारघर शहरातील पदाधिकारी यांनी जनता दरबारात आलेल्या नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे प्रयन्त केले आहेत. त्यातून महत्त्वाचे प्रश्न ज्ञानज्योत विद्या मंदिर येथे काही विद्यार्थी शिक्षण घेत होते,परंतु त्यांना कोरोंनाच्या काळात शाळेची फी भरता आली नाही त्यामुळे या शाळेने त्यांना दुसर्या ठिकाणी शालेय शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी शाळेचा दाखला दिला गेला नाही परंतु ते काम क्षणाचाही विलंब न लावता दाखले मिळवून देण्यात आले.तसेच हर्मनी स्कूल खारघर से-36 येथे एक विद्यार्थ्याचे वडील अपंग असल्याने शाळेची फी 20000 हजार माफ करून घेण्यात आली. त्याच प्रमाणे खारघर शहरामध्ये एमएससीबी महावितरण यांच्या लाइट डीपी बंद नसल्याने मनुष्यहानी होऊ शकते या अनुषंगाने खारघर शहरातील एमएससीबी डीपी बंद करण्यात आलेल्या आहेत. खारघर शहरामध्ये झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे. अपीज शाळेच्या बसेस स्वत: चे मैदान असून रोड ला बसेस उभ्या करायचे परंतु त्यावर संबधित शाळेला निवेदन देऊन त्यांना स्वत:च्या मैदानात बस लावण्यास भाग पाडले.