। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांनी आरटीपीसीआर करणे सक्तीचे नसून केवळ खबरदारी म्हणून चाकरमानी अॅण्टीजेन टेस्ट करु शकतात. आरटीपीसीआर केली नाही म्हणून चाकरमान्यांना गावात कोणी अडवणार नाही असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा.कोरोनाचे नियम पाळा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. खबरदारी म्हणून चाकरमान्यांनी अॅण्टीजेन चाचणी करावी. गावात त्यांना कोणीही अडवणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.