| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |
कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाला टी-20 मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू आणि भारतीय चाहते खूप निराश झाले आहेत. खेळात जय-पराजय असतो, पण पराभवानंतर भारतीय संघ ज्या पद्धतीने वागत आहे, ते खरोखरच आश्चर्यकारक आहे.मात्र संघाला मालिका गमावल्याचे दुःख वाटत असल्याचे प्रशिक्षख राहुल द्रविडने म्हटले आहे.
पराभवानंतर राहुल द्रविडने मीडियाशी संवाद साधला. भारतीय संघाचे काय चुकले ते त्यांनी पत्रकारांना सांगितले. टी-20 मालिकेतील पहिले 2 सामने गमावल्यानंतर संघाचे चांगले पुनरागमन केले. संघाने सलग दोन सामने जिंकले. मात्र शेवटच्या सामन्यात संघाला मालिका व्यवस्थित पूर्ण करता आली नाही आणि संघाकडून काही चुका झाल्या. चांगली फलंदाजी करू शकली असती हे राहुल द्रविड यांनी मान्य केले. हा एक युवा संघ आहे आणि तो तयार केला जात आहे. प्रशिक्षकांनी शेवटी सांगितले की, मालिका गमावल्याबद्दल आम्हाला दु:ख असल्याचे द्रविडने मान्य केले. राहुल द्रविड यांचे हे विधान खरोखरच आश्चर्यकारक आहे. कारण ज्या संघाचे ते युवा म्हणून वर्णन करत आहेत ते खेळाडू भरपूर टी-20 क्रिकेट खेळतात. या सर्व खेळाडूंनी आयपीएलमध्ये अनेक सामने खेळले आहेत. तसेच, त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि इतर सुविधा आहेत. परंतु जेव्हा संघ वेस्ट इंडिजकडून मालिका गमावतो तेव्हा ते त्याला युवा संघ म्हणतात. मुख्य प्रशिक्षकच नाही तर कर्णधारानेही असेच काहीसे सांगितले. हार्दिक पांड्या म्हणाला की, कधी कधी पराभव चांगला असतो. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि राहुल द्रविड यांची बॉडी लँग्वेज आहे, ती पाहता मालिका गमावल्याने त्यांच्यात फारसा फरक पडला नसल्याचे स्पष्ट होते.