। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग मतदारसंघाचे शिवसेनेचे आ. महेंद्र दळवी पळून गेले आहेत. दहा पक्ष फिरुन आलेल्या दलबदलू दळवीला कसले आले हिंदूत्व. त्यांच्या जाण्याने खर्या अर्थाने येथील शिवसेना, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. दळवी म्हणजे 100 गोठ्यातून शेण खाऊन आलेला माणूस आहे. आता या बैलाला बदलायची वेळ आली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच शिवसेनेची फसवणूक करणार्यांना फटके देण्याची वेळ आली आहे. हिम्मत आणि बहुमत असेल तर लपून बसायची वेळ का आली? असा सवाल खा. संजय राऊत यांनी अलिबागमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात उपस्थित केला.