चिंचोटीत साकव बांधण्यास सरपंचांची टाळाटाळ

देवयानी पाटील यांचा आरोप
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटी येथे साकव बांधला जावा,अशी मागणी मासिक सभेत करुनही तो बांधण्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेकाप सदस्या देवयानी पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी माहिती देताना सांगितले की, गावातील जानकीबाई रामचंद्र पाटील (अंधेरीवाले) यांच्या घराजवळील साकव बांधण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी मागितली होती. तसा ठराव घेऊन तो सर्वानुमते मंजूरही करण्यात आला. त्यासाठी सत्ताधारी सदस्यांचे प्रत्येकाचे वैयक्तिक मत विचारले असता सर्वांनी मान्य असल्याचे सांगितले. पण आता त्या ठरावाला 20-22 दिवस उलटून गेले आणि आपले थेट सरपंच काही केल्या त्यावर सही करायला तयार नाहीत. त्यामुळे प्रशासकीय मान्यता आणि निधी हातात असूनही आपल्या गावाचा विकास फक्त आणि फक्त सरपंचाच्या आडमुठेपणामुळे थांबणार आहे, मागच्या वेळीही गावातील दोन रस्ते असेच अडवले गेले.असेही देवयानी पाटील यानी निदर्शनास आणले आहे.

Exit mobile version