। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या 55 प्राथमिक शाळांची पडझड झाली आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांचे 2 कोटी 20 लाख 91 हजारांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात 22 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने चिपळूण, खेड तालुक्यांमध्ये हाहाकार उडाला होता. त्याचबरोबर संगमेश्वर, लांजा राजापूर आणि दापोली येथील नद्यांनाही छोटे-मोठे पूर आल्याने नुकसान झाले. चिपळूण, खेडमध्ये आजही नुकसानग्रस्तांना मदतीचा ओघ सुरुच आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी अनेक इमारतींची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.जिल्ह्यातील राजापूर, संगमेश्वर, खेड, चिपळूण आणि दापोली या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली. अतिवृष्टीमुळे 55 प्राथमिक शाळांच्या 88 वर्गखोल्यांची पडझड झाली आहे. त्यामध्ये चिपळूण तालुक्यात नुकसानीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या तालुक्यात सुमारे 1 कोटी 81 लाख रुपये नुकसान आहे. नुकसानग्रस्त शाळांमध्ये काही शाळांची पूर्णत: पडझड झालेली असून, काहींच्या वर्गखोल्यांचे नुकसान झाले आहे.