शारवी इलेव्हनची बाजी

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा हरेश्‍वर मैदानात दि. 5,6, 7 मे रोजी आयोजित मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शारवी इलेव्हन कोर्लई संघ प्रथम विजेता ठरला. तर, द्वितीय क्रमांक जय मल्हार अलिबाग, तृतीय क्रमांक माऊ इलेव्हन थळ, चतुर्थ क्रमांक नवयुग चौल यांनी विजय पटकाविला. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलदांज माऊ इलेव्हन थळ संघाचा सुमेध पत्रे, उत्कृष्ट फलदांज शारवी इलेव्हन कोर्लई संघाचा कैवल्य पाटील, तर मालिकावीर जय मल्हार अलिबाग संघाचा वैभव कांबळी यांची निवड करण्यात आली.


या स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना उध्दव ठाकरे गट जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, ग्रा.प. उपसरपंच अजित गुरव, ग्रा.प.सदस्या कल्याणी बाजी, ज्येष्ठ क्रिकेटपटू नितेश बांगडेकर आणि ग्रामस्थ चौल चुनेकोळीवाडा यांचे उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेत प्रथम क्रमांकास 30 हजार व चषक, व्दितीय क्रमांकास 15 हजार व चषक, तृतीय क्रमांकास 7 हजार व चषक, व चतुर्थ क्रमांकास 7 हजार व चषक तसेच प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच चषक, उत्कृष्ट गोलदांज चषक, उत्कृष्ट फलदांज चषक व मालिकावीर यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेचा बक्षिस समारंभ सुरेंद्र म्हात्रे, अजित गुरव, कल्याणी बाजी, रेवदंडा ग्रा.पं. सदस्य संदीप खोत, नितेश बांगडेकर आणि ग्रामस्थ चौल चुनेकोळीवाडा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेत पंचाचे काम स्वप्नील लगोरी, विकी सुर्वे, रिझवान पटवी, आकाश तवसाळकर, सुशांत बांगडेकर यांनी पाहिले, तरसमालोचन रोशन भोईर आदीने केले. गुणलेखनाचे काम बाळकृष्ण धरणे गुरूजी यांनी पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नवयुग चौल चुनेकोळीवाडा संघ सदस्य, चौल चुनेकोळीवाडा ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version