पनवेल पालिकेविरोधात शेकाप आक्रमक

काळ्या फिती लावून घंटा गाड्यांचे पूजन

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल पालिकेने घाईघाईत गाड्यांचे टेंडर पास करून नवीन 50 पेक्षा जास्त घंटा गाड्या खरेदी केल्या. मात्र, गेली चार-पाच महिने त्या तशाच कामोठेमधील मल:निसारण केंद्रात धूळखात पडून आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने घंटागाड्यांना हार घालून पूजन केले. तसेच, पालिकेचा गचाळ कारभाराचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधल्या. यावेळी शेकापचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे, उपाध्यक्ष नितीन पगारे, कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, संघटक अल्पेश माने, व्या. संघटना अध्यक्ष सुरेश घरात उपस्थित होते.

पालिकेने घाईघाईत गाड्यांचे टेंडर पास करून नवीन 50 पेक्षा जास्त घंटा गाड्या खरेदी केल्या मात्र गेली चार-पाच महिने त्या कामोठेमधील मल:निसारण केंद्रात धूळखात पडून आहेत. तर पालिकेचे प्रशासन गाड्या कमी आणि ना दुरुस्त असल्याचे सांगून कचरा उचलण्यास टाळाटाळ करत आहेत. काही ठिकाणी गळक्या गाडया वापरत असल्याने कचऱ्याच्या पाण्याचा दुर्गंध दिवसभर राहत आहे. ऐन सणासुदीला परिसरात फिरताना नाकावर रुमाल घेऊन फिरावे लागत आहे. पालिकेने एकूण 53 गाड्या खरेदी करून रोड टॅक्स भरून वाहने पासिंग करून सुद्धा नागरिकांच्या सेवेत उतरवण्यात आली नाहीत.

पालिकेच्या सत्ताधिकारी आणि प्रशासनाचा भ्रष्ट्राचार नागरिकांच्या नजरेत येऊ नये यासाठी कामोठे जास्त वर्दळ नसलेल्या मधील सेक्टर 32 येथील मल:निसारण केंद्रात ठेवल्या आहेत. आजूबाजूला गवत वाढल्याने ही वाहने भंगारात टाकली आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. अडगळीत असल्याने उंदीर-घुशी यांना हक्काचा निवारा मिळाला आहे. त्याच बरोबर एक पावसाळा गाड्यांनी अंगावर घेऊन त्यांना आता गंज चढला आहे. दसऱ्या निमित्त शेतकरी कामगार पक्षाने घंटागाड्यांना हार घालून पूजन केले. तसेच, पालिकेचा गचाळ कारभाराचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधल्या. या गाड्या लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत आणाव्यात. तसेच, पालिकेचे माजी सत्ताधिकारी आणि प्रशासन यांना जर गाड्या 7-8 महिन्यांनी वापरात आणायच्या होत्या तर निव्वळ दलाली लवकर मिळावी यासाठी या गाड्या लवकर खरेदी केल्या का, असा आरोप कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी केला.

Exit mobile version