शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत शेकाप आवाज उठविणार

ऑगस्टमध्ये सांगली जिल्ह्यात मेळावा
| सांगली | प्रतिनिधी |

राज्यातील शेतकर्‍यांच्या विविध मुलभूत प्रश्‍नांबाबत राज्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने भिवघाट, ता.खानापूर, जि.सांगली येथे रविवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पश्‍चिम महाराष्ट्रव्यापी शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याला शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, माजी आम. संपतराव पाटील, प्रदेश कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड.राजेंद्र कोरडे, मध्यवर्ती चिटणीस मंडळ सदस्य बाबासाहेब कारंडे,सागर आल्हाट, अ‍ॅड.समीर देसाई, सांगली जिल्हा चिटणीस शरद पाटील, बाबूराव लगारे, सुभाष पाटील, अजित सूर्यवंशी, अर्जून थोरात,संपत पवार,भरत पाटील, बाबासाहेब देवकर आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. भिवघाट येथील विश्‍वचंद्रा मल्टिपर्पज हॉल येथे हा मेळावा होणार असल्याची माहिती निमंत्रक दिगंबर कांबळे यांनी दिली आहे.अधिक माहितीसाठी 9404368836,9403401799 येथे संपर्क साधावा.

Exit mobile version