। अलिबाग । प्रतिनिधी ।
कोर्लईच्या सरपंचांनी मुख्यमंत्र्यांचे बंगले नसल्याचा खुलासा केल्यानंतर हरवलेले बंगले शोधण्यासाठी किरीट सोमय्या शुक्रवारी (दि. 18) कोर्लईत आले. मात्र शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणताही अपशब्द वापरल्यास खपवून घेणार नसल्याचे रोखठोक सांगितले. तसेच भाजपने संयम बाळगावा, अन्यथा परिणाम वाईट होतील, असा इशाराही शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला. शिवसेना कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून पळ काढल्याची चर्चा सुरु झाली.