| उरण | वार्ताहर |
गेले काही दिवस चालू आसलेल्या वादळी पावसामुळे उरणमधील मासेमारी नौका उरणच्या करंजा व मोरा या बंदरांवर 90 टक्के बोटी परतल्या आहेत. तर, उर्वरित बोटींनीदेखील किनार्याचा रस्ता धरला आहे. त्यामुळे काही दिवस उरणच्या मासळी बाजारात मासळीची आवक घटणार आहे.
रायगड जिल्ह्यात काही दिवस पावसाने जोर धरला आहे. त्यात जोरदार वारेदेखील वाहत आहेत. त्यामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळत असून, समुद्रातील वातावरण अगदी धोकादायक बनले आहे. या जोरदार वार्यांमुळे खोल समुद्रात मासेमारी करणे धोकादायक झाले आहे. तसेच मासेमारी बोटींचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे. हे नुकसान टाळण्यासाठी मासेमारीसाठी सज्ज होऊन गेलेल्या बोटी मासेमारी न करताच बंदरात परतल्या आहेत. तर, बाकी बोटींनीदेखील परतीचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे विकेंडला खवय्यांना ताज्या मासळीपासून वंचित राहावे लागणार आहे.