खड्ड्यांमुळे अपघात वाढले
| खोपोली | वार्ताहर |
खोपोली पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची काही ठिकाणी दयनीय अवस्था झाल्याने याचा नाहक त्रास वाहन चालकानसह प्रवाशी वर्गाला करावा लागत असताना डोळवली व केळवली दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करणे दुरपस्त झाले आहे, खड्यामुळे लहान मोठे अपघात होत असुन संबधित खात्याचे या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याने वाहन चालकानंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शासनाने लाखो रुपये खर्च करुन खोपोली पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची निर्मिती केली. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अती वेगाच्या वाहनामुळे दिवसा, रात्री-अरात्री अंधारामध्ये लहान मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता धोक्याची घंटा देत असून वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत असल्याने वाहन चालकांनमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावरुन आजुबाजुच्या गावातील नागरिक, शाळकरी मुले याचा ही मोठ्या प्रमाणावर ये-जा असल्याने यांना ही या खड्डाशी सामना करावा लागत असल्याने हा रस्ता त्वरीत दुरूस्त करावा अशी मागणी वाहन चालकासह केळवली, नांवढे आदी विभागातील नागरिकांनी केली आहे.
डोळवली व केळवली दरम्यान रस्त्यावर पडलेले मोठंमोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देत असताना, मात्र संबधित खात्याचे या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. तर संबधित खात्याचे असलेले दुर्लक्ष एखाद्या वाहन चालक किंवा प्रवासी वर्गाच्या जीवाशी खेळू शकतो, त्यामुळे येथील रस्त्याची लवकर दुरुस्ती करावी जेणकरून सर्वांचा प्रवास सुखकर होईल अशी प्रतिक्रिया धनंजय आगीवल,समाधान दिसले यांनी व्यक्त केली आहे.