रघुजीराजे आंग्रे यांचे प्रतिपादन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागला समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे प्रत्येक अलिबागकराने अभिमानाने म्हटले पाहिजे, होय…मी अलिबागहून आलो आहे, असे प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्रीमंत रघुजीराजे आंग्रे यांनी केले. जेएसएम महाविद्यालाच्या केळूसकर सभागृहात गुरुवारी दि.11आंग्रे यांचे अलिबाग शहराचा ऐतिहासिक वारसा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, अॅड. दत्ता पाटील लॉ. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. रेश्मा पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. सुनील आनंद, डॉ मिनल पाटील, संस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. पी. बी. आचार्य तसेच इतर प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवक उपस्थित होते.
आंग्रे यांनी आपल्या भाषणात अलिबाग शहराचा राजकीय, भौतिक सामाजिक, सांस्कृतिक इतिहास स्पष्ट केला. रायगड जिल्ह्याची ऐतिहासिक पाश्वर्र्भूमी विशद करताना छत्रपती शिवाजी महाराज तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांची युद्धनीती, आरमाराचे साम्राज्य आणि विविध लढायांविषयी माहिती दिली. अलिबाग शहराचा सामाजिक आर्थिक विकास कशा पद्धतीने झाला, याबाबत रघुजी राजे आंग्रे यांनी महिती दिली.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी अलिबाग शहराची माहिती दिली व काही आठवणी मनोगतात व्यक्त केल्या. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी व्याख्यानाचा हेतू स्पष्ट केला. विद्यार्थ्यांना आपण ज्या शहरामध्ये राहतो, त्या शहराचा इतिहासमाहिती असणे आवश्यक आहे, असे मत प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. कपिल कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी आठवले यांनी केले.