आता मंदिरांवर खर्च होतोय : योगी आदित्यनाथ

। धेसळ । वृत्तसंस्था ।
आमच्या सरकारने सरकारी पैसा हा मंदिरांची सजावट, पुन:निर्माणासाठी वापरला. आधीच्या सरकारने केवळ कब्रस्थानांभोवती कुंपणाच्या भींती बांधण्यासाठी पैसा वापरला होता, अशी टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.
अयोध्येमधील दीपोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जनतेला आणि आपल्या मंत्रीमंडळातील सहकार्‍यांना संबोधित करताना योगींनी हे वक्तव्य केलं. उत्तर प्रदेशमध्ये बदल दिसतोय. पूर्वी राज्यामधील लोकांचा पैसा (सरकारी निधी) का कब्रस्थानांच्या भींती बांधण्यासाठी खर्च केला जायचात. आज हा पैसा मंदिरांचा पुन:विकास आणि सुशोभिकरणासाठी वापरला जातोय. हा विचारांमधील फरक आहे. ज्यांना कब्रस्थानांची काळजी होती त्यांनी त्या ठिकाणी पैसा खर्च केला. ज्यांना धर्म आणि संस्कृतीची चिंता आहे ते सध्या पैसा धर्म आणि संस्कृतीचं जनत करण्यासाठी वापरत आहेत, असं योगींनी सरकारचं काम कशापद्धतीने केलं जातंय याबद्दल बोलताना सांगितलं.

Exit mobile version